भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान ३ मोहिम यशस्वी करत जगात भारताची मान उंचावली आहे. या कामगिरीसाठी जगभरातून इस्रोचं अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनीही इस्रोचं कौतुक केलं. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांकडून सरकारच्या धोरणांमुळे होणाऱ्या नुकसानीवर उपाय म्हणून कांद्याला ४ हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी होत आहे. याशिवाय राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचीही जोरदार चर्चा आहे. राजकारणासह राज्यातील अशा सर्वच घडामोडींच्या लाईव्ह अपडेट एका क्लिकवर…
This post was created with our nice and easy submission form. Create your post!
GIPHY App Key not set. Please check settings